घरव्हिडिओतथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही

तथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही

Related Story

- Advertisement -

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा मारला. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. यावरुन केंद्र सरकारवर टीका केली जाते. मात्र, तथ्य असल्याशिवाय कारवाई होत नाही. संजय राऊत ज्याप्रमाणे बोलतात की, ‘जमिनीचे व्यवहारच जर तुम्हाला कुणाचे काढायचे असतील तर ईडीनं आधी अयोध्या जमीन घोटाळ्याची चौकशी करावी. हे कोणीही तथ्य नसताना करत नाही. त्यामुळे संजय राऊत हे वड्याचे तेल वांग्यावर काढत आहेत’, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -