- Advertisement -
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवस चांगलेच गाजले. गदारोळ, घोषणाबाजी, हमरीतुमरी, शिवीगाळ आणि आमदारांचे निलंबन यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात चांगलाच राडा झाला. या दरम्यान, आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गोंधळ घातला आणि जागेवरुन उठून तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा-कौर यांच्यावर टीका केली आहे. ‘बायको जात चोरते, नवरा राजदंड पळवतो’, हे तर बंटी-बबली निघाले, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केला आहे.
- Advertisement -