- Advertisement -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. काश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे. अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे, आम्हाला वाटलं होतं की नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चाललं आहे. ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत. पण तो चित्रपट आहे, ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील, तेवढं स्वातंत्र्य आपल्या देशात आहे, असं संजय राऊत म्हणाले.
- Advertisement -