- Advertisement -
बेस्टचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईकरांकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात असताना बसच्या फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अनेकदा एक तास थांबूनही इच्छित बस वेळेवर येत नाही असा आरोपही प्रवाशांकडून केला जात आहे. प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त पाच रुपये मोजावे लागत आहेत. मंगळवारपासून हा निर्णय लागू झाला आहे.
- Advertisement -