- Advertisement -
जगावर कोणतेही संकट आले तरी कोकणी लोक देवाकडे गाऱ्हाणे घालून त्या संकटाचा नायनाट करतात. आता सध्या करोनामुळे सर्वचजण भयभीत झाले असताना देवगडच्या ग्रामस्थांनी गाऱ्हाणे गायले आहे. वाडे देवगड येथे श्री महालक्ष्मी मंदिर येथे रवळनाथ मंदिर येथून शिवकळा (तरंग) आले त्या वेळी जगात आलेल्या कोरोना व्हायरसला कायमचा नष्ट करण्यासाठी बारा पाचाच्या मत्तान देवाक साकडे घालताना परब मंडळी आणि ग्रामस्थ.
- Advertisement -