- Advertisement -
मीरा रोड येथील प्रेम नगर इमारतीमध्ये जाळ्यात घार अडकली होती. सर्प संस्थेचा स्वयंसेवक रविश गुप्ता याने तिची सुटका केली. ही घार जाळीमध्ये तीन ते चार दिवस फसली होती. इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने घारीला पाहिल्यावर फोन करून माहिती दिली. एवढे दिवस तिने एकही अन्नाचा दाना न खाल्ल्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. तसेच उन्हामुळे तिला उष्माघाताचा झटका बसला होता. तिच्यावर प्राथमिक उपचार करून निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले.
- Advertisement -