- नझाकत खानसोबतच अंशुमन राठीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
- हाँगकाँगचे सलामीवीर नझाकत खान आणि अंशुमन राठ यांनी अप्रतिम सुरुवात केली आहे. नझाकत खानने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
- भारतातर्फे शिखर धवनने सर्वाधिक १२७ धावा केल्या. त्याला रायडूने ६० धावा करत चांगली साथ दिली. हाँगकाँगकडून किंचित शाह याने ३ विकेट घेतल्या.
- शिखर धवन बाद झाल्यानंतर भारताच्या इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला २८५ धावांपर्यंतच मजल मारता आली.
- शिखर धवन (१२७) आणि धोनी (०) पाठोपाठ माघारी परतले आहेत. आता भारताच्या डावाची भिस्त कार्तिक आणि केदार जाधववर आहे.
- शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील १४ वे शतक झळकावले आहे. त्यामुळे भारताचे द्विशतक पूर्ण झाले आहे.
- आशिया चषकात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूने अर्धशतक केले. पण ६० धावांवर त्याला एहसान नवाझने बाद केले.
- रोहितची विकेट लवकर गमावल्यानंतर धवन आणि रायडू यांनी भारताचा डाव सावरला आहे. या दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले.
- भारताची चांगली सुरुवात झाली पण कर्णधार रोहित शर्मा २३ धावांवर बाद झाला.
- भारत आणि हाँग काँगमधील सामन्यात हाँग काँगने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला पदार्पणाची संधी दिली आहे.