- Advertisement -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित करताना वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेत आहोत अशी घोषणा केली. यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. निवडणुकांमध्ये राजकीय फटका बसू नये यासाठी हे काळे कायदे मागे घेण्यात आल्याचा घणाघात विरोधकांनी केला आहे. तसंच, ज्या सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलकांना दहशतवादी म्हटलं ते आता माफी मागणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
- Advertisement -