नुतक्याच काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील तीर्थक्षेत्र अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणात ढगफुटी होऊन दुर्घटना घडली होती. या सर्व प्रकारामुळे अमरनाथ यात्रा स्थिगित करण्यात आली होती. दरम्यान, आता अमरनाथ येथील वातावरण पूर्वरत झाल्याने यात्रेला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून यात्रेकरू अमरनाथ गुहेच्या दिशेने रवाना झाले आहेत. ढगफुटी यात्रेकरूंना अमरनाथ गुहेच्या दिशेने जाण्यास बंदी घालण्यात आली होती, मात्र आता यात्रा पुन्हा सुरू झाल्याने यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
८ जुलैला रोजी होती ढगफुटीमुळे
८ जुलै रोजी अमरनाथ गुहेजवळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्याच दरम्यान ढगफुटी होऊन पूर आला. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण अजूनही बेपत्ता आहेत. तर जखनी लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ८ जुलै रोजी अचानक मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्याने अमरनाथ यात्रा काही वेळासाठी स्थिगित करण्यात आली होती. त्यामुळे यात्रेसाठी आलेले यात्रेकरू यात्रा पुन्हा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
J&K | Amarnath yatra which was partially suspended due to cloudburst has resumed. After being halted in Jammu, the fresh batch of #Amarnath pilgrims have started to move from the Jammu base camp pic.twitter.com/OkDCh8Vpwc
— ANI (@ANI) July 10, 2022
“We are filled with energy and will not go back without darshan of Baba. We have full faith in Baba Bhole and are waiting for the darshans of Baba. We are happy that the yatra has resumed. CRPF and other personnel have guided us to move ahead safely,” said the pilgrims pic.twitter.com/snekaI6JXB
— ANI (@ANI) July 10, 2022
खरंतर, कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून भारतातील सर्व तीर्थ क्षेत्र बंदी घालण्यात आली होती. दरम्यान दोन वर्षानंतर आता यात्रा चालू झाल्या आहेत. त्यामुळे यात्रेकरूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी यात्रेकरूंनी आपल्या भावना सुद्धा व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणाले की, ‘आम्ही भोलेनाथ बाबांच्या दर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहोत, भोलेनाथांचा आर्शिवाद घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही. यात्रा पुन्हा सुरू झाल्याने आम्ही खूप खूश आहोत. यात्रेवेळी सुखरूप जाण्यासाठी CRPF आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत आहे.’