- Advertisement -
विद्यमान खासदार अरविंद सावंत यांनी केवल मराठी अस्मितेचे राजकारण केले. मात्र दक्षिण मुंबईतील कोळी समाज, भाडेकरू, गिरणी कामगार यांचे कोणतेही काम केले नाही. मी खासदार असताना दक्षिण मुंबईतील भाडेकरूंसाठी लढलो होतो. आता पुन्हा सत्ता आल्यास प्रत्येक मुंबईकराला ५०० स्क्वेअर फूटचे घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार मिलिंद देवरा यांनी दिली आहे.
- Advertisement -