दिल्लीत शुक्रवारी रात्री गोकुळपूरी भागातील एका झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत ७ जणांचा मृत्यूची झाल्याची घटना घडली आहे. आता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवले असून ७ जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या अग्नितांडवामध्ये जवळपास ३०हून अधिक झोपडपट्टी जळून खाक झाल्या आहेत, अशी माहिती दिल्लीच्या अग्निशमन दलाने दिली आहे.
We recovered 7 charred bodies which are unrecognisable, it seemed that these people were sleeping & couldn't escape as the fire spread extremely fast. 60 huts were also completely burnt. We are yet to know the reasons behind the fire: Atul Garg, Delhi Fire Director pic.twitter.com/zP4F12qqRG
— ANI (@ANI) March 12, 2022
माहितीनुसार दिल्लीच्या अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर झोपडपट्टीतील भीषण आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आताही कूलिंगचे काम सुरू आहे. ही घटना गोकुळपूरच्या मेट्रो पिलर नंबर १२ जवळची असल्याचे म्हटले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले की, ‘सकाळी, सकाळी ही दुःखद बातमी ऐकायला मिळाली. मी स्वतः तिथे जाऊन पीडित लोकांना भेटणार आहे.’
Seven people died in a fire that broke out in the shanties of Gokulpuri area last night. The fire was brought under control, seven bodies recovered by the Fire Department: Delhi Fire Service
— ANI (@ANI) March 12, 2022
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा गोकुळपूरच्या झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही ताबडतोब घटनास्ठळी अग्निशमन दलाचे पथक पाठवले. तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळावरून ७ जणांचे मृतदेह मिळले आहेत.
Seven people died in a fire that broke out in the shanties of Gokulpuri area last night. The fire was brought under control, seven bodies recovered by the Fire Department: Delhi Fire Service
— ANI (@ANI) March 12, 2022
ईशान्य दिल्ली जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले की, ‘रात्री १ वाजता गोकुळपूरी ठाणे क्षेत्रातील एका झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती मिळाली. तात्काळ सर्व बचाव उपकरणासोबत पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्ठळी पोहोचले. मग त्वरित अग्निशमन दलाने बचावकार्य सुरू केले. पहाटे ४ वाजता या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत ३० हून अधिक झोपडपट्टी खाक झाली आहे आणि ७ जणांचा मृत्यू झाला आहे.’
हेही वाचा – Jammu & Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा