घरदेश-विदेशआसाममधील पूराचे भीषण संकट काही थांबेना; आत्तापर्यंत १०८ मृत्यू, ३० जिल्हे प्रभावित

आसाममधील पूराचे भीषण संकट काही थांबेना; आत्तापर्यंत १०८ मृत्यू, ३० जिल्हे प्रभावित

Subscribe

पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी उद्या आणखी फौजफाटा येणार आहे

आसाममधील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर रुप धारण करत आहे. या पुरात गुरुवारी झालेल्या सात जणांच्या मृत्यूमुळे एकूण मृतांची संख्या ही 108 वर पोहचली आहे. आसाममधील पुरस्थिती पाहता राज्याचे मुख्यमंत्री हिमंता विश्व सरमा यांनी पुरग्रस्त जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार, पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे. यात 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे, तर बुधवारी 32 जिल्ह्यांतील पूरग्रस्तांची संख्या 54.5 लाख होती.

आसाममधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे आणि आव्हानाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले, पूरग्रस्त भागात लष्कर आणि एनडीआरएफचे पथक उपस्थित आहेत. ते बचावकार्य करत आहेत आणि बाधित लोकांना मदत करत आहेत. IAF ने बचाव कार्याचा एक भाग म्हणून 250 हून अधिक उड्डाणे केली आहेत.

- Advertisement -

दरम्यान आज मे महिन्याच्या मध्यापासून पुरामुळे 108 लोकांचा मृत्यू झाला आहे, कचर आणि बारपेटा येथे प्रत्येकी दोन, बजली, धुबरी आणि तामुलपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना बहुतांश बाधित जिल्ह्यांमध्ये गळती लागली आहे. मात्र काही ठिकाणी पुराचे पाणी ओसरले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मे महिन्याच्या मध्यात राज्यात आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या आता 108 वर पोहोचली आहे.

हवाई पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बराक खोऱ्यातील पूरस्थितीचा आढावा घेत विविध घोषणा केल्या आहेत. पूरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी सिलचरला आणखी तुकड्या पाठवण्यात येणार आहेत. सरमा यांनी कचार जिल्ह्यातील सिलचर येथे आढावा बैठकीनंतर उपायुक्त कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले की, “एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. मात्र अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी उद्या आणखी फौजफाटा येणार आहे.

- Advertisement -

पुरामुळे आठवडाभरापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या या कामासाठी लष्कराच्या किती तुकड्या तैनात केल्या जातील, हे त्यांनी सांगितले नाही . बराक व्हॅली, कचार, करीमगंज आणि हैलाकांडी हे तीन जिल्हे भीषण पूरग्रस्त आहेत. बराक आणि कुशियारा नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत असून, सहा लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की बारपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे जिथे 10,32,561 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. कामरूपमध्ये 4,29,166, नागावमध्ये 4,29,166, धुबरीमध्ये 3,99,945 लोक बाधित झाले आहेत. दरम्यान, पुरामुळे राज्यातील शाळांमध्ये एक आठवडा अगोदर उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.


‘राज्यातील सत्ताबदलाच्या हालचालींशी भाजपचा संबंध नाही, प्रस्ताव आल्यास…’ चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -