अयोध्या राम मंदिराच्या जागेसंबंधी अखेर मध्यस्थी नेमणुकीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला आहे. या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीची नेमणूक करण्यात आली असून यामध्ये श्री श्री रविशंकर, श्री राम पंचू यांच्यासह माजी न्यायमूर्ती एफ. एम. खलीफुल्ला यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्रिसदस्यीय समितीत न्या. खलीफुल्ला यांच्या अध्यक्षेखाली सदस्यांना ४ आठवड्यात अहवालाचा तपशील बनवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला असून हा अहवाल पुढील ८ आठवड्यात पूर्ण करून कोर्टासमोर सादर करायचा असल्याचेही न्यायाधिशांनी यावेळी सांगितले.
Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute case: Supreme Court in its order also said that the reporting of the mediation proceedings in media will be banned. https://t.co/QpjYDyemmS
— ANI (@ANI) March 8, 2019
दरम्यान, प्रसार माध्यमांना मध्यस्थीच्या अहवाल प्रक्रियेची माहिती देण्यासंबंधी बंदी घालण्यात आली आहे.
Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute case in Supreme Court: CJI Ranjan Gogoi says, “Court monitored mediation proceedings will be confidential.”
— ANI (@ANI) March 8, 2019