घरदेश-विदेश१ लाख ७५ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

१ लाख ७५ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Subscribe

भारतातील कोरोना संकटाची परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. देशात सध्या १ लाख ७५ हजार कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण असून देशातील कोरोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस मंदावला आहे. याशिवाय बर्‍या होणार्‍या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दुसरीकडे सरकारची कोरोना लसीकरण मोहीम, या सर्व कारणांमुळे भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या लसीकरणाच्या मोहिमेवर भाष्य केले आहे. भारतात जलद गतीने कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे .

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी दुपारी दोन वाजता 25 लाख पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लस टोचली गेली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. देशात सध्या 1 लाख 75 हजार कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. भारतात सर्वात वेगाने 10 लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले आहेत.

- Advertisement -

कोरोनाची लस टोचल्यानंतर आतापर्यंत 16 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे प्रमाण एकूण लोकांच्या 0.0007 टक्के इतके आहे. आतापर्यंत नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एकाही व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लस टोचल्याने झालेला नाही. याशिवाय कोरोना लसीचा कोणताही गंभीर परिणाम आढळलेला नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने याआधी दिली आहे .

भारताने कोरोना संसर्गाला रोखले : हर्षवर्धन
भारताला कोरोना संसर्गाला रोखण्यात बर्‍यापैकी यश आल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आज मंत्र्यांसोबतच्या बैठकीत म्हणाले. देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. सहा जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून तर 21 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -