गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर भारत-चीन सीमावाद निर्माण झाला होता. त्यानंतर अद्याप भारत-चीन सीमेवरील तणाव कायम असून गेल्या काही महिन्यांपासून भारत-चीन सीमा संघर्षाने तोंड वर काढले आहे. चीनकडून सातत्यानं सीमेवर आगळीक केली जात असून, चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले असले, तरी सीमेवरील तणाव कायम असून, दोन्ही देशांमध्ये पुढील आठवड्यात लष्करी पातळीवरील चर्चा होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चर्चेची ही सातवी फेरी पार पडणार आहे.
दोन्ही देशात लष्करी चर्चा सुरू
चिनी सैन्यानं पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या पूर्व भागात घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्तक असलेल्या भारतीय लष्कराने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पुन्हा सीमेवर तणाव वाढला. दरम्यान, गलवान संघर्षानंतर यावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशात लष्करी चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या सहा फेऱ्या आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, सातवी फेरी पूर्व लडाखमध्ये १२ ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशातील आमनेसामने आलेले सैन्य मागे घेण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
India and China to hold Corps Commander-level talks on October 12 in Eastern Ladakh sector to address the ongoing military standoff between the two countries. So far, The two sides have held six rounds of Corps Commander-level talks: Indian Army Sources
— ANI (@ANI) October 4, 2020
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर गलवानमध्ये २० जवान शहीद झाल्याने भारताने संताप व्यक्त केला होता. मात्र, चीनकडून गेल्या काही महिन्यांपासून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचेही प्रयत्न होत असून सीमेवरील तणाव कमी होण्याऐवजी वाढताना दिसतोय. त्यानंतर पेंगाँग सरोवर परिसरात किमान तीनवेळा चिनी सैन्याने भारतीय जवानांना इशारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप सीमेवरील ताणतणाव कायम असून तिढा कायम आहे.