घरदेश-विदेशभारताची लोकसंख्या चीनच्या वाढीपेक्षा दुप्पट

भारताची लोकसंख्या चीनच्या वाढीपेक्षा दुप्पट

Subscribe

भारताच्या संख्येत वाढ झाली असून भारताची लोकसंख्या वाढीची टक्केवारी ही चीनच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार समोर आले आहे.

भारताच्या संख्येत वाढ झाली असून भारताची लोकसंख्या ही चीनच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. भारताच्या लोकसंख्येत वाढ झाली असून ती १३६ कोटींवर पोहोचली आहे. २०१० ते २०१९ या काळात १.२ टक्के वार्षिक दराने ही वाढ झाली आहे. चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ निम्म्याने जास्त असल्याचे समोर आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

ही आहे भारताची लोकसंख्या

भारताची लोकसंख्या २०१९ मध्ये १३६ कोटींवर पोहोचली आहे. तर १९९४ मध्ये ती ९४.२२ कोटी इतकी होती. तत्पूर्वी १९६९ मध्ये लोकसंख्या ५४.१५ कोटी इतकी होती. जगाच्या लोकसंख्येत वाढ होऊन २०१९ मध्ये ती ७७१.५ कोटी इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही आकडेवारी ७६३.३ कोटी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, २०१० आणि २०१९ मध्ये भारताच्या लोकसंख्येत १.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच्या तुलनेत चीनची लोकसंख्या २०१९ मध्ये १४२ कोटींवर पोहोचली आहे. ही १९९४ मध्ये १२३ कोटी तर १९६९ मध्ये ८०.३६ कोटी इतकी होती. या अहवालानुसार, भारतात १९६९ मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर ५.६ टक्के इतका होता. तो १९९४ मध्ये ३.७ टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मावेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.

- Advertisement -

देशाची ६ टक्के वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. तसेच भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. तर देशात माता मृत्यूदर १९९४ मध्ये एक लाखांमागे ४८८ इतका होता. त्यात घट होऊन २०१५ मध्ये हा दर प्रती लाख १७४ मृत्यू इतपर्यंत घटला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -