सध्या देशासह जगभरात कोरोनाने कहर केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवर टीका केली आहे.
From the very beginning #WHO in this #Covid_19 has been scaring the world instead of giving hope
Initially they commented #coronavirus was not that serious and now changes everyday pic.twitter.com/JnRp3yPBpU— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 14, 2020
“सुरूवातीपासूनच करोना माहामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना लोकांना धीर देण्याऐवजी उलटं घाबवरण्याचं काम करत आहे. सुरूवातीला कोरोना विषाणू जास्त धोकादायक नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि आता ते कोरोना बाबतीत सारखं आपलं विधान बदलत आहेत.” असं म्हणत आव्हाड यांनी WHO वर निशाणा साधला. त्यांनी ट्विट करत टीका केली आहे. मूलभूत नियमांचं पालन न केल्यास याचे परिणाम गंभीर ते अतिगंभीर होतील, असा इशारा WHO ने सर्व देशांना दिला होता.