घरदेश-विदेशKargil Vijay Diwas : शहीदांची शौर्यगाथा नव्या पिढीला प्रेरणा देणारी - पंतप्रधान

Kargil Vijay Diwas : शहीदांची शौर्यगाथा नव्या पिढीला प्रेरणा देणारी – पंतप्रधान

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, २६ जुलै रोजी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र आजचा दिवस खास असून त्यांनी कारगिल युद्धातील जवानांचे स्मरण मन की बातच्या सुरूवातीला केले असून या युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली आहे. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६७ वा एपिसोड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांच्या शौर्याला नमन केले. (सविस्तर वाचा)


राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून कारगील दिनानिमित्त अभिवादन केले. भारतीय सैन्यातील आपल्या वीर जवानांच्या शौर्य व धैर्याला कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने मानाचा मुजरा!, असे त्यांनी नमूद केले.

- Advertisement -


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९९९ साली झालेल्या कारगील युद्धातील जवानांसाठी गौरवोद्गार काढले असून देश त्यांच्या बलिदानाला कधीही विसरणार नाही. त्यांची शौर्यगाथा आपल्याला नेहमीच प्रेरीत करेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

- Advertisement -


भारतीय लष्करातील जवानांनी कारगिल युद्धा दर्शवलेल्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली अमर जवान विजय स्तंभाला भेट दिली.


दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारगिल युद्धातील जवानांना श्रद्धांजली दिली असून त्यांनी या दिवसाच्या आठवणीत ट्विट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, संपूर्ण जगाला माहिती असलेल्या इतिहासातील काही काळापूर्वी घडलेल्या आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीतील या युद्धात विजय मिळवणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला मी सलाम करतो. तर गृहमंत्री अमित शहा यांनी, कारगिल विजय दिन हा भारताचा अभिमान, पराक्रम आणि खंबीर नेतृत्वाचे प्रतिक आहे. कारगिलच्या डोंगरांवरुन शत्रूला पिटाळून लावत तिथे पुन्हा तिरंगा फडकवणाऱ्या जवानांच्या धैर्याला मी अभिवादन करतो. आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वस्वपणाला लावणाऱ्या या नायकांचा देशाला अभिमान आहे, असे नमूद केले आहे.


वाळू शिल्पकार प्रयागराज यांनी कारगिल युद्धातील सैनिकांचे शौर्य दर्शवणारे वाळू शिल्प बनवून कारगिल युद्धाच्या २१ वर्षपूर्तीच्या निमित्ताने शहीद जवानांना आदरांजली वाहिली आहे.


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारगिल दिवस निमित्ताने दिल्लीतील विजयस्तंभ येथे जाऊन शहीद जवानांना अभिवादन केले.


भारताने पाकिस्तानविरोधात कारगिल युद्धात विजय मिळवण्याच्या घटनेला आज २१ वर्ष पूर्ण झाली आहे. १९९९ साली हे कारगिल युद्ध झाले होते. या युद्धात शहीद झालेल्या जवानांचो हौतात्म्य कधीही विसरता येणार नाही. त्यांना आजच्या दिवशी देशभरातून विविध प्रकारे श्रद्धांजली दिली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -