घरदेश-विदेशशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ

Subscribe

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रब्बी हंगामाच्या निर्णयाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रब्बी पिकांच्या हमीभावात ८५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीअगोदरच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळाल्याचे बोलले जात आहे. आज केंद्रीय मंत्रीमंडळाची दिल्लीत कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत रब्बी पिकांचा हमीभाव वाढवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, हमीभावा संदर्भात घेतल्या गेलेल्या या निर्णयामुळे केंद्र सरकारवर ३ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -