राजस्थानच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात संघर्ष सुरू असतानाच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्यावर गंभीर आरोप होत असल्याचे समोर येत आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री गेहलोत यांचे सरकार वाचवण्यासाठी भाजपच्या वसुंधरा राजे प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी केला आहे.
काय म्हणाले बेनीवाल
अल्पमतात आलेल्या गेहलोत सरकारला वाचवण्यासाठी वसुंधरा राजे या जोरदार प्रयत्न करत आहेत. वसुंधरा राजे यांनी काँग्रेसच्या अनेक आमदारांना यासाठी फोनही केले आहेत.
मीडिया के बयानों के अनुसार स्वयं @ashokgehlot51 जी कह रहे है कि उनके पास कॉल रिकॉर्डिंग उपलब्ध है ऐसे में फोन टैप करवाना संविधान प्रदत अधिकारों का हनन है,स्वच्छ लोकतंत्र में गहलोत जी ऐसे हथकंडे कर रहे है जो शोभनीय नही है !@RLPINDIAorg
— HANUMAN BENIWAL (@hanumanbeniwal) July 16, 2020
खासदार हनुमान बेनीवाल हे केंद्रातील सत्तेत असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार आहेत. गेहलोत सरकार वाचवण्यासाठी वसुंधरा राजे यांनी अनेक आमदारांना फोन केल्याचा आरोप बेनीवाल यांनी केला आहे. भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात छुपी युती आहे. ते दोघंही एकमेकांच्या भ्रष्टाचारांवर पांघरूण घालत आहेत, असा आरोप बेनीवाल यांनी केला आहे.
हेही वाचा –
Vivo ने भारतात लाँच केले ट्रू वायरलेस इयरफोन; जाणून घ्या किंमतीसह वैशिष्ट्य