देशात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि दररोज नवीन रूग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारी देशभरात ४७ हजार ७०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६५४ जणांचा बळी गेला आहे. तर आतापर्यंत ३३ हजार ४२५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
The recovery rate among #COVID19 patients has increased to 64.23%. The recoveries/deaths ratio is 96.6%:3.4% now: Government of India https://t.co/ozAOv0Z1Eq pic.twitter.com/9pcyZ6rl7m
— ANI (@ANI) July 28, 2020
३३ हजार ४२५ जणांचा मृत्यू
देशात कोरोनामुळे अनेकांचे बळी देखील जात असून आतापर्यंत कोरोनामुळे ३३ हजार ४२५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सध्या १४ लाख ८३ हजार १५७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर ४ लाख ९६ हजार ९८८ Active केसेस आहेत. तर आतापर्यंत ९ लाख ५२ हजार ७४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
१६ कोटी ६५ लाख १ हजार ८०३ जणांना कोरोनाचीबाधा
तर जगात आतापर्यंत १६ कोटी ६५ लाख १ हजार ८०३ जणांना कोरोनाचीबाधा झाली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ५६ हजार ६७२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर दुसरीकडे १० कोटी २३ लाख ७ हजार ४७२ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या जगात ५ कोटी ७५ लाख ७ हजार ६५८ Active केसेस आहेत.
हेही वाचा – COVID 19 tests : देशात २४ तासांत ५ लाखांहून अधिक चाचण्या!