आपल्या बोल्ड आणि बिनधास वक्तव्यामुळे मीडिया तसेच बॉलीवूडमध्येही कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. महात्मा गांधी यांच्या मृत्यूनंतर आनंद साजरा करणारे आज सत्तेत आहेत, असे स्वरा भास्कर दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत म्हणाली. सध्या भाजप सत्तेवर असून महात्मा गांधीच्या विचारांना विरोध करणाऱ्यांपैकी हा एक पक्ष असून स्वराच्या या वक्तव्यामुळे आता भाजपकडून काय प्रतिक्रीया येईल हे पहावे लागणार आहे.
नेमक काय म्हणाली स्वरा
या देशात महात्मा गांधी सारख्या महापुरूषाची हत्या झाली. त्यावेळी देखील काही अशीच लोकं होती, जे आनंदोत्सव साजरा करत होते. आज ते सत्तेवर आहेत. त्या सर्वांना तुरूंगात टाकायला हवे, हो, ना. नक्कीच नाही.
Is desh mein Mahatma Gandhi jaise mahaan insaan ki hatya hui, us waqt bhi kuch aise log the jo celebrate kar rahe the unki hatya ko, aaj wo satta mein hain, un sabko daal dena chahiye jail mein?, nahin na. Obvioulsy nahi: Actor Swara Bhaskar in an interaction with media in Delhi pic.twitter.com/vZPaeIIWVl
— ANI (@ANI) September 1, 2018