पंतप्रधान मोदींनी आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या प्रचाराला सुरुवात केली. बिहारमधील सासाराममध्ये त्यांची पहिली सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमारही सभेत उपस्थित होते. मोदींनी भोजपुरीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाचा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवण्याचा निर्णय घेणार, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील पहिल्या प्रचारसभेत केली.
दरम्यान, देशाच्या शिक्षणव्यवस्थेत बिहारचा इतिहास गौरवशाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातून प्रेरणा घेऊन आता वैद्यकीय, अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमही मातृभाषेत शिकवण्याचा प्रयत्न असेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
जेईई मेन परीक्षेत प्रादेशिक भाषांमध्ये वाढ
इंजिनीअरिंगच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम म्हणजेच जेईई मेनसंबंधीही एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली. यानुसार, जेईई मेन ही प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाते. या प्रादेशिक भाषांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेत परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा इंग्लिश, हिंदी आणि गुजराती या तीनच भाषांमध्ये घेण्यात येत होती.
📢Announcement📢
In line with the vision of #NEP2020, the Joint Admission Board (JAB) of #JEE (Main) has decided to conduct the JEE (Main) examination in more regional languages of India. @DG_NTA
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) October 22, 2020
शिक्षणात भाषा अडथळा ठरु नये हा उद्देश
देशातील २२ प्रादेशक भाषांना प्रोत्साहन देण्याचे आमचे धोरणं आहे. कोणीही भाषा लादायचा किंवा इंग्लिश भाषा नको असाही उद्देश नाही. परंतु भाषा निवडीचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवं आणि शिक्षणात भाषा ही अडथळा ठरु नये असा यामागील उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी सांगितले.
बिहारच्या निवडणुकीत कलम ३७०
बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी मोदी असे म्हणाले, “बिहारच्या पुत्रांनी तिरंग्यासाठी आणि भारत मातेची मान उंच ठेवण्यासाठी गलवान व्हॅलीत बलिदान दिलं. पुलवामा हल्ल्यातही बिहारचे जवान शहीद झाले. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो”
NDA govt abrogated Article 370. These people say they will bring it back if they come to power. After saying this they dare to ask for votes from Bihar. Is this not an insult of Bihar? The state which sends its sons and daughters to the borders to protect the country: PM Modi pic.twitter.com/AcsGcKJg5i
— ANI (@ANI) October 23, 2020