आणीबाणी घोषणेच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केला. अमित शाह यांना प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाला, स्वतःला प्रश्न विचारण्यास सांगितले आहेत. केवळ दोन लोकच सरकार का चालवतात आणि इतरांना का बाजूला सारलं गेलं? असे सवाल कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केले आहेत.
रणदीप सुरजेवाला यांनी गुरुवारी ट्विट करत भाजपवर पलटवार केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “देशाचा सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपने स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजेत. बहुमतासह सत्तेत बसलेल्या सरकारमध्ये केवळ दोनच लोकच सरकार का चालवतात? उर्वरित लोकांना का बाजूला सारलं गेलं? नेहरू-गांधींचा तुम्हाला तिरस्कार का आहे?” असे प्रश्न त्यांनी भाजप आणि अमित शाहांना विचारले आहेत.
As India’s ruling party, BJP needs to answer:
Why is its majoritarian rule described as Govt of 2 people only & all others as mere side kicks?
Why is horse trading, mass defections & institution capture its only legacy?
Why is it obsessed in its vile hatred of Nehru-Gandhi’s? https://t.co/wGO9gMegj4
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 25, 2020
प्रश्न त्यांना पण विचारायला हवा ज्यांनी आपल्या गुरू आणि साथीदारांना जबरदस्तीने सेवानिवृत्त करुन अपमान केला आहे. लालकृष्ण अडवाणी, एमएम जोशी, केशुभाई पटेल, कलराज मिश्रा, सुषमा स्वराज, हरेन पंड्या, संजय जोशी … ही यादी खूप लांब आहे.
And so spoke those, who occupied present positions by forcibly retiring & humiliating every patriarch & colleague who built them
And the list is long….
Sh. L.K.Advani,
Sh. M.M.Joshi,
Sh. Keshubhai Patel,
Sh. Kalraj Mishra,
Smt. Sushma Swaraj,
Sh. Haren Pandya,
Sh. Sanjay Joshi pic.twitter.com/1mNipA5GAf— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) June 25, 2020
हेही वाचा – एमडी, एमएसच्या परीक्षा पुढे ढकला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोदींना पत्र