सायन येथील समता नगरमध्ये राहणारे संदेश बळीराम म्हात्रे आणि त्यांचे कुटुंबीय दरवर्षी इको- फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतात. गेली ३९ वर्षे ते बाप्पाची मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा करतात. विशेष म्हणजे ते बाप्पासाठी इको- फ्रेंडलीच सजावट करतात. त्यांच्या घरी ५ दिवस बाप्पा असतो. त्यांचा बाप्पा शाडूच्या मातीपासून घडवला जातो. तर बाप्पासाठी तयार केलेला देखावा हा इको- फेंडली असतो. यंदाही त्यांनी बांबू आणि नारळाच्या झावळीपासून बाप्पाची मनमोहक सजावट केली आहे.
- Advertisement -