झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ (Punha Kartavya Aahe) या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. या मालिकेतून अभिनेता अक्षय म्हात्रे (Akshay Mhatre) आणि अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) ही नवी कोरी जोडी भेटीला आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत सध्या आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. दरम्यान तिने या मालिकेच्या सेटवर आपली माणसे मिळाल्याचे सांगितले आहे.
मालिकांच्या शूट शेड्युल असं असत की कलाकार घरापेक्षा जास्त वेळ सेटवर घालवतो. हे सर्व कलाकार एकत्र शूट करतात , हसतात , खेळतात , एकत्र जेवतात एकमेकांची एखाद्या परिवारासारखी काळजी घेतात. ‘पुन्हा कर्तव्य आहे मध्ये वसुंधरेची भूमिका साकारत असलेली अक्षया हिंदाळकरला ही सेट वर आपली माणसं मिळाली आहेत. घरापासून शूट लोकेशन दूर असल्यामुळे अक्षयाला घरातून जेवणाचा डब्बा नेहमी आणण शक्य होत नाही. अश्यावेळी सेटवर तिचे अन्नदाता तिची काळजी घेतात असं अक्षयाने सांगितलं आहे.
अक्षयाने आपल्या सेटवरच्या अन्नदातां बद्दल बोलताना सांगितले, “मी नवी मुंबईला राहते म्हणून घरातून जेवण आणणे खूप क्वचितच होतं जेव्हा सुट्टी असते किंवा लेटचा कॉल टाइम असेल तेव्हा मी घरातून डब्बा घेऊन येते. पण जर माझा डब्बा नसेल तर मालिकेत माझी आई शमा निनावणेकर आणि अक्षय हे दोघे घरातून डब्बा आणतात. हे दोघे ही माझे अन्नपूर्णा आहेत. ते नेहमी माझ्यासाठी ही डब्बा आणतात आणि तो मी खाते. मला खूप छान वाटतं की माझ्या वाटणीच ही ते जेवण घेऊन येतात.”
___________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde