अनेक वर्षा पासून खिचडी या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असली तरी या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा आजवर प्रेक्षकांच्या चांगल्याच आठवणीत आहेत. या मालिकेत प्रफुल्ल आणि हंसाच्या मुलीच्या म्हणजेच चकीच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा भद्राला पाहायला मिळाले होते. या मालिकेनंतर तिने बा बहू और बेबी, मिसेस. तेंडुलकर, गुमराह यांसारख्या मालिकांमध्येही काम केले होते. मनोरंजन क्षेत्रात कुशल अभिनय शैलीमुळे आणि अनोख्या तंत्रज्ञानाबद्दल नेहमीच बोलले जाते. परंतु या क्षेत्रात काम करत असताना कास्टिंग काऊचच्या त्रासाला अनेक महिलांना सामोरे जावे लागते. काही महिला भाग्यवान असतात. त्यांना अशा गोष्टींचा अनुभव येत नाही पण काहींकडे पर्याय देखील नसतो.
View this post on Instagram
खिचडी मालिकेतील बालकलाकार म्हणून काम केलेल्या रिचा भद्राने नुकताच एका गोष्टीचा खुलासा केला. कास्टिंग काऊचला कंटाळल्यामुळे तसेच त्याचा सामना करवा लागेल, म्हणून रिचा भद्राने टेलीव्हिजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. रिचाने बालकलाकार म्हणून चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पण आता रिचा अभिनय क्षेत्रापासून कित्येक वर्षं दूर असल्याचे दिसत आहे.
…म्हणून बॉलिवूड सोडले
अभिनेत्री रिचाने अभिनय क्षेत्र सोडण्यामागे एक खास कारण असल्याचे नुकत्याच एका वृत्तपत्राच्या संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तिने असे देखील सांगितले की, ‘मी बालकलाकार म्हणून अनेक मालिकांमध्ये काम केले. मी लहानपणापासूनच हेल्दी आहे. आजकालच्या अभिनेत्रींप्रमाणे मी बारीक नाही. मी जाडी असल्याने मला त्याचप्रकारच्या रोलविषयी विचारण्यात येत असे. मला कोणत्याही भूमिकेत अडकून राहायचे नव्हते. या क्षेत्रात करियर करायचे असेल तर वजन कमी करण्याची तुला गरज आहे असे मला सांगण्यात येत असे. पण केवळ या इंडस्ट्रीत करियर करण्यासाठी वजन कमी करणे मला पटत नव्हते. तसेच रोमँटिक सीन करायचा नाही अथवा कोणत्याही प्रकारे स्वतःला एक्सपोझ करायचे नाही असे माझ्या कुटुंबियांचे म्हणणे होते. त्यामुळे, मी असा निर्णय घेतला.’