घरफिचर्सबहुआयामी लेखिका गौरी देशपांडे

बहुआयामी लेखिका गौरी देशपांडे

Subscribe

गौरी देशपांडे या मराठीतील लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले. मराठी बरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले. त्यांचा जन्म ११ फेब्रुवारी १९४२ रोजी झाला. प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले. मराठी साहित्याला स्त्री लेखिकांची मोठी परंपरा लाभली आहे.

ताराबाई शिंदे, लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून ते अगदी आजच्या कविता महाजन, मोनिका गजेंद्रगडकर याच्यापर्यंत असंख्य स्त्रियांनी निरनिराळ्या पातळीवरून स्त्री आयुष्याचे चित्र वाचकांपुढे उभे केले. या सगळ्या प्रभावळीत गौरी देशपांडे यांनी केलेल्या लिखाणाचे वेगळेपण हे विशेष आहे. त्याआधीच्या बर्‍याचशा साहित्यात स्त्रियांचे कौटुंबिक प्रश्न किंवा पुरुषी वर्चस्वामुळे निर्माण झालेले प्रश्न चर्चिले गेले होते. गौरी देशपांडे यांची पिढी ही स्वातंत्र्योत्तर पिढी होती.

- Advertisement -

‘Beetween Births’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्यसंग्रहाने गौरी देशपांडे यांचा लेखनप्रवास सुरू झाला. ‘एकेक पान गळावया’,‘तेरुओ आणि कांही दूरपर्यंत’,‘निरगाठी’, ‘चंद्रिके ग, सारिके ग!’,‘दुस्तर हा घाट’ ,‘थांग’,‘आहे हे असं आहे, ‘मुक्काम’, ‘विंचुर्णीचे धडे’,‘गोफ’,‘उत्खनन’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. गौरी देशपांडे यांच्या लेखनात त्यांच्या मुक्त विचारांचे प्रतिबिंब अगदी स्पष्ट दिसते. त्यांचे लेखन स्त्रीवादी असण्यापलीकडे जाऊन स्वातंत्र्यवादी, व्यक्तिवादी होते. वेगवेगळ्या पातळीवरचे प्रेम, त्या प्रेमाची मोजावी लागणारी किंमत आणि त्या प्रेमाच्या मर्यादा याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनात दिसतात. स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणार्‍या कोणत्याही आधुनिक, मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. अशा या महान लेखिकेचे १ मार्च २००३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -