घरमहाराष्ट्ररेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजुरांचा मृत्यू

रेल्वे रुळावर झोपलेल्या १६ मजुरांचा मृत्यू

Subscribe

मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावर झोपलेले असताना मालगाडीने या मजुरांना धडक दिली. जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली आहे.

देशात करोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आला असून मजूर देशभरातील अनेक राज्यांत अडकून पडले आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे अनेक मजुरांनी पायी प्रवास करणे पसंत केले आहे. त्यातच जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करणारे काही मजूर रात्री जालन्याहून भुसावळला निघाले होते. तिथून ते आपल्या गावी मध्य प्रदेशला जाणार होते. लॉकडाऊनमुळे आपल्या गावी जाण्यासाठी त्यांनी रात्री पायी प्रवास सुरू केला होता. रस्त्यात थकल्यामुळे ते रेल्वे रूळावरच थांबले आणि तिथेच झोपून गेले. गाढ झोप लागल्यामुळे मालगाडी येत असल्याचे त्यांना समजलं नाही. अशातच जालन्याकडून औरंगाबादकडे येणार्‍या मालगाडीने या मजुरांना धडक दिली. एकूण 21 मजूर असून त्यातील 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला. हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील आहेत.

- Advertisement -

देशभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच राज्यांच्या सीमाही बंद असून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्यासही निर्बंध लावण्यात आले आहेत. विशेष अटींसह काही लोकांनाच देशांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात येते. अशातच महाराष्ट्रात अडकलेले अनेक मजुरांनी पायीच आपल्या गावापर्यंत जाण्याचा मार्ग निवडला आहे. केंद्र शासनाच्या वतीने विविध राज्यांत अडकलेल्या मजुरांना आपल्या गावी पोहोचवण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेस सुरु केल्या आहेत. परंतु, असे असतानाही अनेक मजुरांचा पायी प्रवास मात्र सुरूच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -