घरमहाराष्ट्रराज्यातील तापमानात वाढ; वाढत्या तापमानापासून घ्या काळजी

राज्यातील तापमानात वाढ; वाढत्या तापमानापासून घ्या काळजी

Subscribe

कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज

राज्यात सूर्याचा पारा वाढला असून तापमानाचा जोर कायम आहे. राज्यात अनेक परिसरातील पार्याने चाळीशी गाठली आहे. यामुळे, वेगवेगळ्या आजारांसोबत उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात १९ मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे २५ मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.

या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४६ अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान ४७ अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान ४५ अंशापर्यंत पोहचेल.

- Advertisement -

उष्माघातावर त्वरित उपचार करा

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान ४२ अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १८ ते २१ मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -