जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा येथील हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून वारंवार लष्करी जवान, हवाई दलाचे तळ आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला जात आहे. देशात दहशतवादाची भीती निर्माण व्हावी, यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवांनावर हल्ले केले जात आहे. दहशतवाद्यांनी १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
Government Sources: Intelligence input warns against terrorists’ plans to carry out an attack on Srinagar and Awantipora air bases. Security forces on high alert in and around these bases. pic.twitter.com/tQfCSGpmGB
— ANI (@ANI) May 17, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले होते. यातून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. भारतीय हवाई दलाने केलेली हीच कारवाई अतिरेक्यांना चांगलीच झोंबली आहे. त्यामुळे दहशतवादी आता थेट भारतीय हवाई दलाचे तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात गुप्तरचर यंत्रणांनी माहिती दिली आहे. त्यामुळे या भागांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.