औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण तापलं असून आरोप – प्रत्यारोप आणि टीकांचा पाऊस सुरु झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी औरंगाबादमधील भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन तिथल्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत. औरंगजेबाचे नाहीत, त्यामुळे औरंगाबादचं नामकरण “संभाजीनगर” झालंच पाहिजे. पुढे ते म्हणाले कि, “औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेच्या सुनावणीच्या प्रक्रियेला गती देऊन शहराचे नाव बदलले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा महाराष्ट्राचा शत्रू होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”.
महाराष्ट्रा चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचे आम्ही वंशज आहोत.औरंगजेबाचे नाहीत,त्यामुळे औरंगाबादचे नामकरण “संभाजीनगर”झालंच पाहिजे.
-प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलhttps://t.co/9EqQbdlosV— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 29, 2020
नाचता येईना अंगण वाकडे
शेतकरी कर्जमाफीवरुनही चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले की, “नाचता येईना अंगण वाकडे अशी महाविकस आघाडी सरकारची स्थिती आहे. कर्जमाफीच्या नुसत्या घोषणा असून, प्रत्यक्षात अंमलबजावणी काही नाही. सरकारने ३५ लाख जणांची कार्जमाफी करण्याची घोषणा केली, आणि केवळ १५ हजार जणांचीच यादी जाहीर केली. या गतीने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कधी? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल
ते पुढे म्हणाले की, कर्जमाफीसाठी सरकार जर आचारसंहितेचं कारण देत असेल, तर कर्जमाफीसह, थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय रद्द करण्याचा आणि बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय ही थांबवावा लागेल असेही ते यावेळी म्हणाले.