घरमहाराष्ट्रलग्नाचे मंडप बनले कुस्तीचा अखाडा

लग्नाचे मंडप बनले कुस्तीचा अखाडा

Subscribe

लग्न सोहळ्यात आलेल्या वर्‍हाडी मंडळींना किरकोळ कारणावरून माराहण करण्यात आली आहे. यामघ्ये चार महिलांना खुर्च्या फेकून जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सातारामध्ये उघडकीस आला आहे.

लग्न म्हटले तर सर्व तयारीच आली. लग्नामध्ये कोणाला काही कमी पडू नये याची काळजी घेतली जाते. लग्न थाटात करायचे असेल तर सर्व सुविधा पुरवणे आवश्यक असते. लग्नात वऱ्हाडी मंडळीचे विशेष लक्ष ठेवावे लागते. अशा प्रकारच्या पद्धती आतापर्यंत आपण बघत आलो आहोत. मात्र सातारा जिल्ह्यात किरकोळ कारणामुळे वऱ्हाडी मंडळींनाच मारहाण करण्यात आले आहे. या घटनेत वऱ्हाडी महिलांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. फक्त हाथ पायानेच नाही तर त्यांना चक्क खुर्च्यांनी मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर लग्नाचे मंडप बघता बघता कुस्तीचा अखाडा बनला. अशा प्रकारचे दृष्य आपण फक्त चित्रपटात बघतो. मात्र सातारायेथे या घटनेनंतर पोलिसांनाच हस्तक्षेप करावा लागला. या घटनेत ज्यांचे लग्न करायचे होते ते ही गोंधळून गेले होते. सर्वांमध्ये भितीचे वातावरण होते. लग्नाच्या शुभमुहूर्तावर आयोजकांना पोलीस ठाण्याचे तोंड बघावे लागले आहे.

कसा घडला हा प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून साप येथील मंगल कार्यालयात कोरेगाव येथील नाळे परिवारातील लग्‍न होते. सुपारी, साखरपुड्यानंतर हळदीचा कार्यक्रमही मंगलमय वातावरणात पार पडला. मात्र, त्यानंतर जेवणाच्या पंगती बसत होत्या. येथे आलेल्या वऱ्हाडी महिलांनी जेवणावरून वाद घातला. आपल्याला जेवणावरून नाव ठेवले म्हणून मारहाणीचा प्रकार घडला. यामध्ये चौघींनाही डोक्यात, अंगावर व चेहर्‍यावर मारहाण झाल्याने जखमा झाल्या. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी किशोर सुनील बनकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -