घरमहाराष्ट्रLok Sabha 2024: राम राम भारतात नाही तर काय...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर...

Lok Sabha 2024: राम राम भारतात नाही तर काय…; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

Subscribe

रामराम भारतात नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन करायचं का? असा प्रश्न उपस्थित करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

सोलापूर:रामराम भारतात नाही तर मग काय पाकिस्तानात जाऊन करायचं का? असा प्रश्न उपस्थित करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. भाजपा राम नावावर निवडणूक लढवत असल्याचा आरोप ठाकरेंनी केला होता, यावर फडणवीसांनी पलटवार केला आहे. तसंच, ठाकरेंना तुम्ही केलेला एकतरी विकास दाखवा, असा सवालही केला आहे. (Lok Sabha Election 2024 Devendra Fadnavis given answer to Uddhav Thackeray on Ram Ram)

सोलापुरात पंतप्रधान मोदींची आज भव्य सभा होणार आहे. या सभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरेंनी केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

मोदींना मत म्हणजे विनाशाला मत, विकासाला नाही. त्यामुळे जनतेने जागरुक राहावे, असं उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथील जाहीर सभेत म्हटलं होतं. मोदी मतांसाठी राम-राम करत फिरत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

उद्धव ठाकरें यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेत भाजपासह शिंदे गटावर टीकेचा भडीमार केला होता. देवेंद्र फडणवीस हल्ली भाजपा उमेदवारा मत म्हणजे मोदींना मत असा प्रचार करु लागले आहेत. पण मी सांगतो. मोदींना मत म्हणजे विनाशाला मत आहे, असंही ठाकरे म्हणाले होते.

- Advertisement -

मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम भाजपाने केलं आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर बोलताना, संजय राऊत कोण आहेत माहीत नाही, असं कोणी म्हणत असेल तर ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंनी केलेलं एकतरी विकासाचं काम दाखवा

मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतो. तुम्ही केलेलं एकही विकासाचं काम दाखवा. अडीचं वर्षे मुख्यमंत्री राहिले, एक तरी विकासाचं काम दाखवा. आयुष्यात त्यांनी काही विकासाचं काम केलं नाही. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करुन थुंकण्यासारखं आहे, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरे विकृत, तर राज ठाकरे…; नारायण राणेंची टीका)


Edited By-  Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -