न्यायालयीन कारणांमुळे एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. MPSCची परीक्षा ५ आणि १२ फेब्रुवारीला होणार होती परंतु परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. एमपीएससीच्या काही विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढाई सुरु केली असून हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विट करत दिली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर या परीक्षांची पुन्हा घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ट्विट करत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत माहिती दिली आहे. कोरोना काळात उमेदवारांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. आता विद्यार्थ्यांनी आयोगाविरोधात थेट न्यायालयीन लढाई सुरु केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या दिनांक २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी उत्तरतालिकेसंदर्भात उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २ फेब्रुवारी २०२२ ला सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० च्या उत्तर तालिकेसंदर्भातील दाखल रिट याचिकेवर न्यायाधिकरणाचा अंतिम निर्णय झाल्यानंतर विषयांकित परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील पुढील निर्णय घेण्यात येईल. अंतिम न्यायनिर्णय येईपय॑त परीक्षेच्या आयोजनासंदभांतील सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात येत आली असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. २९ जानेवारी, २०२२, दिनांक ३० जानेवारी, २०२२, दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित विषयांकित परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहेत.
जा. क्र. 260/2021 ते 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे. pic.twitter.com/yYxibimdle
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 27, 2022
काय आहे प्रकरण
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग स्वीकारला आहे. मुख्य परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. परीक्षा हुकल्यामुळे मुख्य परीक्षेला बसू देण्यात यावे अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. या विद्यार्थ्यांना न्यायालय दिलासा देणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एमपीएससीने यापूर्वी अनेक वेळा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
हेही वाचा : Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्चला सादर होणार