घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; ५ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; ५ जणांचा मृत्यू, ५ जण जखमी

Subscribe

पुणे एक्सप्रेस वेवर कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. खालापूर मुंबई लेनवर हा अपघात झाला असून अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरधाव कंटेनरची चार वाहनांना धडक लागून हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.
असा घडला अपघात?

मुबंई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री १ वाजण्याच्या सुमारास भरधाव ट्रेलरने इनोव्हा, क्रेटा, टेम्पो आणि ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पुण्याहून मुबंईच्या दिशेने जाणार्‍या वाहनाना कंटेनरने इनोव्हा, कार क्रेटा कार, टेम्पो आणि ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पाच वाहनाचा विचित्र अपघात झाला.

- Advertisement -

या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, अपघातग्रस्त टीमचे सहकारी, देवदूत यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल होत वाहनांत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये नवी मुंबईचे पशुवैद्यकीय अधिकारी वैभव झुंजारेंचा कुटुंबियांसह मृत्यू झाला आहे.

अपघातातील मृत्यू झालेल्यांची नावे
श्रीमती. मंजू प्रकाश नाहर, वय ५८, गोरेगाव, मुंबई,
डॉ. वैभव वसंत झुंझारे, वय ४१, नेरुळ, नवी मुंबई,
उषा वसंत झुंझारे, वय ६३, नेरुळ, नवी मुंबई,
वैशाली वैभव झुंझारे, वय ३८, नेरुळ, नवी मुंबई,
श्रिया वैभव झुंझारे, वय-५, नेरुळ, नवी मुंबई,
अ. नंबर १ ते ५ मयत झाले आहेत.
अपघातातील जखमी
स्वप्नील सोनाजी कांबळे, ३० वर्षे, गोरेगाव, मुंबई
प्रकाश हेमराज नाहर, वय-६५,गोरेगाव, मुंबई
अर्णव वैभव झुंझारे, वय-११,नेरुळ, नवी मुंबई,
किशन चौधरी,
काळूराम जमनाजी जाट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -