जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईतर्फे शनिवारी (ता.१३) राष्ट्रीय लोकदालतीचे आयोजन जिल्हा व सत्र न्यायालय येथे करण्यात आले होते. लोकअदालतमध्ये २३३० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
लोकन्यायालयात दावा दाखल पूर्व प्रकरणामध्ये समजोता घडून आला व १४ हजार ७४७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोकअदालतीमध्ये जिल्ह्यातून न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी १३ हजार ५४५ प्रकरणे व दावा पूर्व दाखल प्रकरणे १ लाख ६ हजार ७७५ प्रकरणे ठेवण्यात आली. प्रलंबित प्रकरणांपैकी फौजदारी ८१८, बँकेची ६४, वाहन अपघात प्रकरने २०५, कामगार विषयक प्रकरणे २, कौटुंबिक वाद १३३, भूसंपादन ५, दिवाणी दावे २२७, इतर प्रकरणे २ अशी एकूण २३३० प्रकरणांचा लोकन्यायालयात निपटारा करण्यात आला.
राष्ट्रीय लोकअदालत न्यायाधीश रविंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली. अदालत यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रसाद कुलकर्णी, सर्व न्यायिक अधिकारी, वकील आदींनी सहकार्य केले.