घरCORONA UPDATEराज्यात अडकलेल्या लोकांना एसटीने घरी सोडणार - विजय वडेट्टीवार

राज्यात अडकलेल्या लोकांना एसटीने घरी सोडणार – विजय वडेट्टीवार

Subscribe

सर्वांना एसटीद्वारे त्यांच्या घरी सोडले  जाणार असून, यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च सरकार करणार असल्याचे देखील वडेट्टीवार यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक जण राज्याच्या विविध भागात अडकले असून, आता या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवले जाणार असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. या सर्वांना एसटीद्वारे त्यांच्या घरी सोडले  जाणार असून, यासाठी लागणारा प्रवासाचा खर्च सरकार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

१० हजार बसेसने सोडणार घरी

दरम्यान या सर्व लोकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी राज्यात १० हजार एसटी बसेस सोडल्या जाणार असून, या प्रवासाचा खर्च मदत व पुनर्वसन विभाग उचलणार आहे. यासाठी जवळपास २० कोटी रुपयांच्या वर अपेक्षित खर्च आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून सुरु होईल, असं देखील वडेट्टीवार यांनी सांगितली. तसेच पुढच्या दोन दिवसात राज्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत एसटीद्वारे सोडले जाईल, असे देखील ते म्हणालेत.

- Advertisement -

काय म्हणाले नेमकं वडेट्टीवार

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात लोकं अडकली आहेत. या लोकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी आम्हाला परिवहन मंत्र्यांनी बसेस देण्याबाबत परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसेसमार्फत ही मोफत सेवा दिली जाणार आहे. यासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला साधारण वीस कोटीच्या आसपास निधी उपलब्ध करून देणार आहोत. तसेच यासाठी आणखी खर्च लागला तरी तो देण्यात येईल. संचार बंदीमुळे अडकलेल्या लोकांना स्वत:च्या जिल्ह्यात जाण्यासाठी मोफत एसटी सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या सर्वच लोकांना पुढील चार ते पाच दिवसात त्यांच्या स्व जिल्ह्यात सोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला यामुळे सुरक्षित आपल्या घरी जाण्यास मदत होणार आहे. एकीकडे परराज्यातील मजुरांना ट्रेन मधून पाठवताना ट्रेनच्या तिकिटाचे पैसे यावरून वाद असताना राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकार स्वतः तिकिटांचा भार उचलणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -