देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत यामध्ये अनेक पक्षांचे विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. पुढील दोन निवडणुकांपर्यंत देशाचे पंतप्रधान पद आरक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. बुधवारी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेता रितेश देशमुख याच्या प्रश्नांचे उत्तर देत त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा भाजपचे नितिन गडकरी या दोघांपैकी कोण पंतप्रधान बनणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देतांना फडणवीस यांनी नाव न घेता पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदींची पसंती दाखवली आहे.
Some more glimpses of #MaharashtriyanOfTheYear Award ceremony.. pic.twitter.com/Au1nmWP5yB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 20, 2019
काय म्हणाले फडणवीस
“पंतप्रधान कोण बनेल असा प्रश्न उपस्थित केला नाही पाहिजे कारण पंप्रधानांची जागा अगोदरच आरक्षित आहे. येणाऱ्या निवडणुकीसाठी नव्हे तर २०२४ पर्यंत हे पद आरक्षित आहे. मात्र महाराष्ट्रातून कोणी पंतप्रधान झाल्यावर मला आनंदच होईल. सेना भाजपची युती झाली असली तरी जागांच्या वाटपा बद्दल अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.” – मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस