घरमहाराष्ट्रपुणेकरांचा कोकणप्रवास विनाअडथळा; कोरोना चाचणी बंधनकारक नाही

पुणेकरांचा कोकणप्रवास विनाअडथळा; कोरोना चाचणी बंधनकारक नाही

Subscribe

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची भूमिका

पुण्यातुन कोकणात गणशोत्सवासाठी जाणाऱ्यांचा प्रवास विनाअडथळा असणार आहे. गणेशोत्सवासाठी १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे. मात्र, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी वेगळी भूमिका घेतली असून पुण्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक नसल्याचं राव यांनी सांगितलं आहे.

दरवर्षी गणेशोत्सवासाठी राज्याच्या विविध ठिकाणांहून नागरिक कोकणात जातात. यंदा कोरोनाच्या संकटामुळे गणेशभक्तांना गावी जाण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. १२ ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १० दिवस क्वारंटाईन राहावं लागणार, अशी सूचना राज्य सरकारने जारी केली. तर, १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं. मात्र, पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक नसल्याचं विभागीय आयुक्त राव यांनी सांगितलं. यामुळे आता मुंबई, ठाण्यातून कोकणात जाणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक असताना पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना सूट कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक नसली तरी मात्र, संबंधित नागरिकांना त्यांच्या भागातील पोलीस यंत्रणेचा परवाना आवश्यक आहे. हा परवाना घेताना गेल्या दोन आठवड्यामध्ये कोरोना संसर्ग न झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे.
– सौरभ राव, विभागीय आयुक्त, पुणे
राज्याच्या कुठल्याही भागातून कोकणात जाण्यासाठी र्निबध लागू करण्यात आले आहेत. १० दिवसांच्या विलगीकरणासाठी विनाचाचणी प्रवासाची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे गुरुवारपासून मुंबई, ठाण्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर आदी कुठूनही कोकणात जायचे असल्यास कोरोना चाचणीचा अहवाल आवश्यक असेल.
– अभय यावलकर, प्रमुख, आपत्ती निवारण विभाग
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -