गेल्या एक महिन्यांपूर्वी औरंगाबमध्ये मालवाहू ट्रेनखाली चिरडून १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पेणमध्ये अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. रोह्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीने रेल्वे रुळावर बसलेल्या तीन तरुणांना चिरडले आहे. यामध्ये सुशील वर्मा (२५), सुनील वर्मा (२४) आणि निखिल गुप्ता (२५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमके काय घडले?
शनिवारी, ६ जून रोजी सुशील वर्मा, सुनील वर्मा आणि निखिल गुप्ता रात्री पेण रेल्वे स्टेशनपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर रेल्वे ट्रॅकवर गेले होते. दरम्यान, ९ वाजून ५० मिनिटांनी पेण रेल्वे स्टेशनवरुन एक मालगाडी रोह्याच्या दिशेने जात होती आणि त्याचवेळी वेळी मालगाडीने या तिन्ही जणांना चिरडले. त्यातच त्यांचा अंत झाला आहे.
रुळावर का आले होते?
हे तिघे रेल्वे रुळावर कशासाठी गेले होते? हा नेमका अपघात आहे की त्यामागे दुसरे काही कारण आहे का? असे एक ना अनेक प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित होत आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – यंदा पावसाळी पिकनिकला मुकणार; पुण्यातील या पर्यटनस्थळांवर आणली बंदी