घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रातील कमळपंथीयांनी चालता बोलता स्वप्न पाहू नयेत; सामनाच्या अग्रलेखातून भाजपला सल्ला

महाराष्ट्रातील कमळपंथीयांनी चालता बोलता स्वप्न पाहू नयेत; सामनाच्या अग्रलेखातून भाजपला सल्ला

Subscribe

महाराष्ट्रातील कमळपंथीयांनी चालता बोलता स्वप्न पाहू नयेत, असा सल्ला या अग्रलेखातून देम्यात आला आहे.

मध्य प्रदेशात काल घडलेल्या राजकीय घडामोडी नंतर आज सामनाच्या अग्रलेखातून महाराष्ट्रातील भाजपला टोला लगावला आहे. मध्य प्रदेशात जे काही पुढे घडेल ते लवकरच समजेल, पण तिथे घडणाऱ्या घडामोडींनी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी उड्या मारु नयेत, असा एकप्रकारचा इशाराच सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देम्यात आला आहे. बुधवारी मध्य प्रदेशात राजकीय घडामोडी घडल्या. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार अशा चर्चांना उधाण आले. यावरुन सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आले आहे.

मध्य प्रदेशात जे काही पुढे घडेल ते लवकरच समजेल, पण तिथे घडणाऱ्या घडामोडींनी महाराष्ट्रातील भाजपवाल्यांनी उड्या मारु नयेत. मध्य प्रदेशचे राजकारण त्याच्या जागी, महाराष्ट्रातील कमळपंथीयांनी चालता बोलता स्वप्न पाहू नयेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेत्वृत्वाखाली चालले आहे. ते मजबूत आणि अभेद्य आहे. त्यामुळे स्वप्न बघणे सोडा,” असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपला देम्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -