घरदेश-विदेश५० दिवसांनंतर आज मुंबईतून धावणार पहिली प्रवाशी ट्रेन

५० दिवसांनंतर आज मुंबईतून धावणार पहिली प्रवाशी ट्रेन

Subscribe

मुंबई सेंट्रल ते नवी दिल्लीदरम्यान होणार प्रवास

तब्बल ५० दिवसांनंतर सर्वसामान्य प्रवाशांसाठी मुंबईतून मंगळवारी पहिली रेल्वे गाडी धावणार आहे. मुंबई सेंट्रलवरून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी दिल्लीसाठी ही विशेष ट्रेन रवाना होणार आहे. या गाडीचे रेल्वे तिकीट बुकिंग सुरू होताच काही तासातच हाऊसफुल झाले आहे.

भारतात करोना विषाणूमुळे लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा २३ मार्चपासून पूर्णपणे बंद होती. भारतीय रेल्वेने रेल्वे सेवा सुरळीत सुरू करण्यासाठी १२ मे रोजी ३० विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या रेल्वे गाड्यांची बुकिंग आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू झाली. नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रल, डिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपूरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या दरम्यान विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेने काही प्रमुख निवडलेल्या मार्गावर या प्रवासी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन्ही दिशेकडे जाण्यासाठी ३० अशा एकूण १५ मेल-एक्स्प्रेसच्या जोड्या मंगळवारपासून धावणार आहेत.

- Advertisement -

मंगळवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून सर्वसामान्य प्रवाशांसाठी पहिली रेल्वे गाडी धावणार आहे. ही राजधानी एक्स्प्रेसच्या वेळेवर अर्थात सायंकाळी ५ वाजता दिल्लीला रवाना होणार आहे. विशेषतः ही गाडी मुंबई सेंट्रल ते दिल्ली दररोज धावणार आहे. ज्या प्रमाणे श्रमिक ट्रेन चालवीत होते त्याच प्रकारची सर्व सुरक्षा लक्षात घेऊन या गाड्या भारतीय रेल्वेकडून चालविण्यात येणार आहेत. विशेष रेल्वे गाड्यातून फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि स्क्रिनिंग करणे बंधनकारक असेल. केवळ वैद्यकीयदृष्ठ्या सुरक्षित असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये जाण्याची परवानगी असणार आहे, अशी माहिती रेल्वेचा अधिकार्‍यांनी दिली आहे.

रेल्वे गाड्या हाऊसफुल
मंगळवारी धावणार्‍या विशेष रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग सोमवारी आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर सुरू झाले. हे तिकीट बुकिंग सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाले. तासाभरात संपूर्ण गाडी फुल झाल्याचे आयआरसीटीसीच्या सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

रेल्वेच्या गाइडलाईन्स पूर्णपणे पालन केल्या जातील. तसेच प्रवाशांना आरोग्याची पूर्णपणे काळजी घेत, फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जाणार आहे. श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहेत, त्याप्रमाणेच या देखील ट्रेन चालविण्यात येणार आहेत.
-रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -