सर्वोच्च न्यायालयाकडून राम जन्मभूमीविषयीचा निकाल जानेवारीमध्ये येणार आहे, त्यामुळे राम मंदिर बांधू इच्छिणार्यांनी काही काळ शांत राहावे, असे आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे.न्यायालयाचा निकाल दोन्ही धार्मिक गटांना न्याय देणारा असेल. बाळासाहेब ठाकरेंचा राष्ट्रभक्त मुस्लिमांना पाठिंबा होता, याचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा आणि राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये, असे त्यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्याबद्दल बोलताना ते म्हणाले की उद्धव ठाकरेंना अयोध्येत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा पक्ष आता अयोध्येत जाऊन पोहोचला आहे. मीदेखील लवकरच अयोध्येला जाऊन दोन्ही धार्मिक गटांतील नागरिकांशी संवाद साधून हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे.