घरमहाराष्ट्रभीषण; कार झाडावर आदळून ३ जण ठार

भीषण; कार झाडावर आदळून ३ जण ठार

Subscribe

या अपघताविषयी तिनही मृतांच्या घरच्यांना कळवण्यात आलं असून, लवकरात लवकर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

बीडमधील माजलगाव येथे एक भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये गाडीतील ३ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. शुक्रवारी (काल) रात्री १० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग २२२ वरील टाकरवन फाट्याजवळ हा अपघात घडला. या अपघातामध्ये सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित या तिघांचा मृत्यू झाला असून, तिघेही मध्यप्रदेशातील कापडाचे व्यापारी असल्याचे तपासात समोर आले आहे. हे तिनही व्यापारी व्यापारसंबंधी व्यवहारासाठी बीडमध्ये आले होते. दिवसभर स्थानिक व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हे तिघं लातूर येथे मुक्कामासाठी चालले होते. गढी, माजलगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग २२२ वरून जात असताना टाकरवन फाट्याजवळ  चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.


वाचा : रामदास कदम हे उध्दव ठाकरेंचं पाळलेलं कुत्रं – नितेश राणे

कारच्या जोरदार धडकेमध्ये सुरेश हरयानी, हेमंत राजपूत आणि रोहित हे तिघंही  जागीच ठार झाले. अपघातानंतर काही वेळातच लोक तिथे जमा झाले आणि त्यातीलच काही जणांनी या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मध्यरात्रीच्या सुमारास तिनही व्यापाऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या अपघताविषयी तिनही मृतांच्या घरच्यांना कळवण्यात आलं असून, लवकरात लवकर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जातील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -