घरताज्या घडामोडीउकाई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोट बुडून ३ जणांचा मृत्यू; ४ बेपत्ता

उकाई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोट बुडून ३ जणांचा मृत्यू; ४ बेपत्ता

Subscribe

उकाई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बोट बुडून ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

महाराष्ट्र – गुजरात राज्याच्या सीमावर्ती भाग असलेल्या उकाई धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पर्यटक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण बेपत्ता झाले आहेत. तर ७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक गुजरातमधील सुंदरपूर गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

उकाई धरणातील बॅकवॉटर जवळील भींतखुद गावाजवळ मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. उकाई धरणाच्या बॅकवॉटर येथे काही जण होळी खेळण्यासाठी आले होते. या बोटीत एकूण १४ जणांचा समावेश होता. मात्र, पाण्यात गेल्यानंतर अचानक बुडाली. बोट बुडू लागल्यामुळे १४ जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. यामुळे अचानक एकच गोंधळ झाला. हा गोंधळ ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि ७ जणांचा जीव वाचवला. मात्र, यामध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर ४ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात करोना!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -