घरमहाराष्ट्रAmbadas Danve : श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घ्यावा; दानवेंनी कोणावर साधला निशाणा

Ambadas Danve : श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घ्यावा; दानवेंनी कोणावर साधला निशाणा

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने साताऱ्यात श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, तब्येतीचं कारण देत पाटलांनी ही उमेदवारी नाकारली. पाटलांच्या या निर्णयावरून शिवसेना – उद्धव गटाचे नेता आणि विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभेच्या अनुषंगाने राज्यातील काही मतदारसंघातील लढती चांगल्याच चर्चेत आहेत. त्यात एक बारामती आहे, त्या खालोखाल साताऱ्याचा मतदारसंघ चर्चेत आहे. बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी शनिवारी जाहीर झाली पण, साताऱ्यातून कोण निवडणूक लढेल याची उत्सुकता होती. शुक्रवारी शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी येथून निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पवारांचे निकटवर्तीय असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत उमेदवारी नाकारल्याचे ते म्हणाले. सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधताना येथून कोणाला उमेदवारी द्यायची याबद्दल येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं जाहीर केलं. राष्ट्रवादीतील या घडामोडीनंतर आता उद्धव गटामध्ये टोलवाटोलवी सुरू झाली आहे. बरेच प्रयत्न करूनही छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून तिकीट नाकारलेले उद्धव गटाचे नेता आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानेवेंनी श्रीनिवास पाटलांचा संदर्भ देत उमेदवारी मिळालेल्या ज्येष्ठ नेते चंद्रकात खैरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर

काय म्हणाले दानवे?

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना श्रीनिवास पाटील यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात अंबादास दानवेंना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकताच अंबादास दानवेंनी, “श्रीनिवास पाटलांकडून अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे,” असं मत व्यक्त केलं. श्रीनिवास पाटलांच्या निर्णयाचा संदर्भ देत अंबादास दानवे म्हणाले की, अशाप्रकारे दुसऱ्यांना संधी देण्याची जी भूमिका त्यांनी घेतली आहे, तो योग्य आहे. शरद पवार साताऱ्यात योग्य तो उमेदवार देतीलच. सगळ्यांनीच तरुणांना, नवीन लोकांना संधी दिली पाहिजे, असेही दानवे म्हणाले.

- Advertisement -

…हा काही टोला नाही

या उत्तरावर हा टोला आहे का?, असं अंबादास दानवेंना विचारल्यावर त्यांनी हसतच हा टोला नाही, असं सांगितलं. अंबादास दानवेंनी थेट कोणाचाही उल्लेख केला नसला तरी त्यांच्या टीकेचा रोख चंद्रकांत खैरेंच्या दिशेने होता, हे कोणालाही सहज कळेल. खैरेंऐवजी आपल्याला उमेदवारी द्यावी यासाठी अंबादास दानवे बऱ्याच काळापासून प्रयत्नशील होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंची यासाठी बैठकही झाली होती. मात्र, उद्धव ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्याचं स्पष्ट झालं.

हेही वाचा – Congress : भाजपाचे हीन राजकारण अधोरेखित होते, सचिन सावंतांचा पीयूष गोयलांवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -