घरमहाराष्ट्रUddhav Vs Devendra : "देवेंद्रजी परिवारावर येऊ नका..." उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Uddhav Vs Devendra : “देवेंद्रजी परिवारावर येऊ नका…” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा

Subscribe

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे.

मुंबई : काल शुक्रवारी (ता. 23 जून) पाटण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी देशातील विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीला देशातील 15 विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रतित्युत्तर दिले आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे, असे म्हणत त्यांनी फडणवीसांना आता थेट इशारा दिला आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना इशारा देत अनेक विषयांवर आपले मत व्यक्त केले. (Uddhav Thackeray warning Devendra Fadnavis)

हेही वाचा – मेहबूबा मुफ्तींच्या प्रकरणावरुन राऊतांचा फडणवीसांना इशारा, म्हणाले, ‘जरा जपून…’

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. वेगळी कोणतीही आसनं तुम्हाला झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, योगा डे.. त्यामुळे परिवारावर बोलू नका. मी परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आणि सर्व शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोणी घेत असेल तर ते तुम्हाला माहीत. मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाव बोलू नका, असा सज्जड दम देखील यावेळी उद्धव ठाकरेंनी भरला.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी येत्या 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्याचं जाहीर केलं. येत्या 1 तारखेला आपण महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. शनिवारी निवेदन कोणाला देणार? असं आम्हाला विचारलं जात आहे. अरे आम्हाला निवेदन द्यायचंच नाही. ज्यांना निवेदन द्यायचं आहे तेच सत्ताधाऱ्यांच्या टेबलाखाली बसले आहेत. त्यामुळे निवेदन कोणाला देणार? कोव्हिड काळातील भ्रष्टाचार जरूर काढा. देशभरात जे सर्व्हे झाले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना जमाल गोटा द्यायचा आहे. त्यांना घोड्याचंच औषध द्यावे लागेल. तरच त्यांचा कोठा मोकळा होईल, असे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -