घरमुंबईआई रागावली म्हणून चेंबूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

आई रागावली म्हणून चेंबूरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

आईच्या सततच्या बोलण्याला कंटाळून वैभव माळ्यावर गेला. आईचा राग आल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

मुंबईमध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. चेंबूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आई रागवली म्हणून या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गळफास लावून आत्महत्या

चेंबूर यथील घाटला गाव परिसरात कुटुंबासह राहणारा १४ वर्षाच्या वैभवने आत्महत्या केली आहे. अभ्यास करत नाही म्हणून वैभवला त्याची आई सतत ओरडायची. सोमवारी सायंकाळी वैभव शाळेत घरी आला आणि मित्रासोबत खेळण्यासाठी निघाला. मात्र त्याच्या आईने त्याला खेळायला जाऊ दिले नाही आणि अभ्यास करायला बसवले. आईच्या सततच्या बोलण्याला कंटाळून वैभव माळ्यावर गेला. आईचा राग आल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

- Advertisement -

अपघाती मृत्यूची नोंद

बराच वेळ झाला वैभव खाली येत नसल्याचे बघून आईने त्याला हाका मारल्या. परंतु आईच्या हाकेला काही प्रत्युत्तर न आल्यामुळे अखेर आईने माळ्यावर जाऊन बघितले असता वैभव गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने वैभावला खाली उतरून नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी वैभवला मृत घोषीत केले. गोवंडी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. आई रागावल्याने वैभवने टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली.

हेही वाचा – 

- Advertisement -

धक्कादायक! आत्म्यांचे व्हिडिओ पाहून मुलीची आत्महत्या?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -