भिवंडीत शुक्रवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. मुसळधार पावसामुळे भिवंडी परिसरात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भातशेतीमध्ये पाऊसाचे पाणी तुंबून राहिल्याने भातलागवड तसेच भाजीपाला पीक कुजून जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शुक्रवारी दिवसभराच्या रिपरिपीनंतर रात्रभर पाऊसाने सतंधारेसह मुसळधारपणे कोसळत राहिल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
या गावांचा तुटला संपर्क
भिवंडी शहरालगतच्या कामवारी नदीसह वारणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे. भिवंडी पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर तसेच नदीनाका आणि खोणी पुलावरून पाणी वाहू लागल्याने जुनांदुर्खी, कांबे ,टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखीवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, कुहे, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा तसेच शेलार, बोरपाडा, कवाड, अनगांव, पिळंजे, अंबाडी, विश्वभारती फाटा, दुगाड, पालखणे आदी गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला आहे.
मुसळधार पाऊसामुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने शहरातील शिवाजीनगर आणि पद्मानगर येथील भाजी मार्केटमधील किरकोळ भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील निजामपूरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्
हेही वाचा – कुर्ल्याहून पहिली लोकल कल्याणला रवाना; हार्बर रेल्वे ठप्प